Manoj Jarange
Manoj Jarange : 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार द्याचा नाही. आता कोणाला पाडायचे ते पाडा आणि कोणाला आणायचे त्यांना आणा असे आव्हान म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी केले. मराठा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज रंगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल (दि. 3) कोण कोणत्या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणार याची माहिती मनोज जरंगे पाटील यांनी दिली होती. तसेच कोणत्या जागेवर उमेदवार पाडण्याचे याबाबत ही सांगितले होते. मात्र आता मनोज जरांगे पाटील यांनी मोठा निर्णय घेत विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे.
हेही वाचा~Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना, डिसेंबरच्या हप्त्याबाबत मोठी बातमी!
मित्र पक्षाची यादी आलेली नाही. त्यामुळे एका जातीवर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य नाही. त्यामुळे समाज बांधवांनी आपापले अर्ज काढून घ्यावेत उमेदवार द्यायचा नाही. आता कोणाला पाडायचे ते पाडा आणि कोणाला आणायचे ते आणा असे आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी (दि.४ ) केले दरम्यान मनोज जरंगे पाटील यांनी रविवारी दिवसभरात विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराची बैठक घेतली. मराठा, मुस्लिम आणि दलित अशी त्री सुत्री घेत या बैठकीत 25 मतदारसंघावर चर्चा करण्यात आली. रात्री चौदा मतदारसंघ ठरवून मराठा समाजाचे उमेदवार अंतिम करण्याचे होते, इतर ठिकाणी मुस्लिम दलित मित्र पक्षातील उमेदवार देण्यावर चर्चा करण्यात आली. सोमवारी पहाटे पाच वाजेपर्यंत कोणत्या जागेवर निवडणूक लढवायची एका जातीवर निवडणूक लढवायची काय यावर चर्चा करण्यात आली. परंतु मित्र पक्षाची यादी सकाळी नऊ वाजले तरी आलेली नाही.
हेही वाचा ~ 10th-12th exam विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा, दहावी-बारावी परीक्षेचे वेळापत्रक फायनल!
यादी आली नसली तरी ते मित्रपक्ष आपलेच आहेत. त्यामुळे जरांगे पाटील यांनी समाजाच्या जीवावर निवडणूक लढविता येत नाही. महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो कोणी आमच्या कामाचे नाही. त्यामुळे कोणाला पाडा आणि कोणाला आणा म्हणण्यात अर्थ नाही. तुमच्या मतदार संघात तुम्हाला ज्याला मदत करायची त्याच्याकडून मी तुमच्या मागण्याशी सहमत आहे. असे लिहून घ्या. असे आव्हान केले. आम्ही निवडणुकीत असलो तरी समोरच्यांचा खेळ खल्लास आणि नसलो तरी खेळ खाल्लास असे म्हणत. विरोधकांना जरांगे पाटील यांनी इशारा दिला. तसेच आता गनिमी काव्याने समाजाची ताकद दाखवू असेही ते म्हणाले
मी आणि माझे आंदोलन
मी राजकारणात नाही मी आणि माझे आंदोलन आहे कोणी मला खवळले तर मी त्याचा खेळ खल्लास करेन लोकसभा पॅटर्ननुसार आम्ही आमची भूमिका घेणार आहोत
कोणत्याही अपक्षाला पाठिंबा नाही
सर्व उमेदवारांनी आपले अर्ज मागे घ्यावेत. आपण कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा दिलेला नाही. राखीव असो किंवा इतर जागा असो. तेथे आमचा पाठिंबा अद्याप तरी जाहीर केलेला नाही. असेही जरांगे पाटील म्हणाले.
आमचे सोशल मीडिया
तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या माहितीस्तव या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा.